केज किसान दि.२ गौतम बचुटे

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

केज तालुक्यातील लाखा येथे एका चाळीस वर्षीय विवाहीतेने नवऱ्याच्या छळाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी मयत विवाहिततेच्या नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार दि. ३१ जुलै रोजी लाखा ता. केज येथे संगिता संतोष रामिष्ट वय (४० वर्ष) हिला तिचा नवरा संतोष नागनाथ रामिष्ट हा याने तिचा शारिरीक व मानसिक छळ करुन त्रास देवुन मारहाण केली. त्या त्रासाला कंटाळुन संगीता हिने लाखा गावातील भाकरे यांच्या विहीरीत पाण्यात उडी मारुन मारुन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास संतोष याने प्रवृत्त केले व तिच्या मरणास तिचा नवरा कारणीभूत आहे. मयत संगिता रामिष्ट हिला दोन मुले व दोन मुली अशी चार अपत्ये असून दोन्ही मुली विवाहित आहेत.

या प्रकरणी मयत संगिता रामिष्ट हिचा भाऊ बळीराम सुंदरराव हंडीबाग (रा. आनेगाव ता. केज) यांच्या तक्रारी वरून संतोष रामिष्ट याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४६४/२०२३ भा दं वि ३०६ विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक : रमेश गुळभिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

सोनिजवळा सरपंचांचे वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ‌ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव,गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांनी गेल्या आडीच वर्षात गावत होत असलेल्या विकास कामाचा पाडा वाचुन शुभेच्छा दिल्या. या बरोबर गावातील तरुण व मित्र परीवाराने शुभेच्छाचा वर्षाव केला या मुळे सत्कारमूर्ती गोविंद बापु ‌ससाणे हे भाराऊन गेले सत्काराला उत्तर देताना गोविंद बापु ‌ससाणे म्हणाले की,हे ग्रामस्थ व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊन मला नवीन ऊर्जा दिली. मी यापुढे गावाचा विकास करुन दाखवेल तेंव्हाच हे हार,शाल, गुच्छ यांच्या ओझातुन उतराई होईल मी कायम नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कोणाचही काम आसेल तर मला अर्धा रात्री फोन करा मी उपलब्ध होईल, कोणाचही काम करण्यासाठी कुचराई पणा करणार नाही गाव माझ आणि मी गावचा आहे, मतभेद आसु शकतात मन भेद नाहीत , सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा आहे या वेळे सरपंच गोविंद ससाणे यांनी मित्रपरिवार व ग्रामस्थांचे आभार मानले.